महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ४ थी
व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.
त्यानुसार आंबेगाव तालुक्यात ४ थी साठी १९ केंद्रांवर २९९० विद्यार्थी व इयत्ता ७
वी च्या ९ केंद्रावर १८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. असे आंबेगावचे
गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी
सांगितले.
यावर्षी प्रथमच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना
केंद्रसंचालक म्हणून नियुक्त केले होते. गटविकास अधिकारी विवेक इलमे व
गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगाव, वळती, पिंपळगाव, मंचर, रांजणी, चांडोली इ. परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच विस्तार अधिकारी सुनील
सूर्यवंशी, रामदास पालेकर, के.के.जारकड, कमल जाधव, मालती आढारी व सर्व
केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, विशेष शिक्षक यांनी सर्व केंद्रांना भेटी दिल्या.
सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. .jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment