१६ एप्रिल २०१४ :
कोणत्याही निवडणुका असल्या कि त्या सक्षमपने पार पाडण्याची खूप मोठी जबाबदारी सरकारवर (निवडणूक आयोगावर )असते. यासाठी प्रत्येक गावामध्ये मतदान केंद्र असते आणि त्या ठिकाणी एक हुशार, तल्लख, योग्य निर्णय घेणारी व्यक्ती अपेक्षित असते. अश्या हजारो लोकांचा तुटवडा भरण्यासाठी गावोगावी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे योगदान देणारे शिक्षक सज्ज झाले आहेत २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीसाठी....
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये निवडणूक आयोगाचे केंद्र केले असून नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर प्रत्येक व्यक्तीला पोहचविण्याची सोय करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment